रमाई आवास योजना-ग्रामीण
योजनेबाबत: दिनांक १५ नोव्हेंबर २००८ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आली आहे. सदर योजनेचे नाव हे, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी घरकुल योजना या नावाऐवजी रमाई आवास योजना असे नाव देण्यात आले आहे.
स्वरुप :- सदर योजनेंतर्गत इंदिरा आवास योजना या केंद्र पुरस्कृत योजनेमध्ये दारिद्रय रेषेखालील लामार्थ्यांना लाभ देण्यात येत होता. मात्र, आता केंद्र शासनाने, इंदिरा आवास योजनाऐवजी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सुरु केली असून त्यामध्ये लाभार्थ्यांची निवड सामाजिक, आर्थिक, जात, जनगणनेनुसार (SECC) केली जात आहे. त्यानुसार सुधारीत निकष ठरविण्यात येत आहे.
योजनेचे अनुदान:-
१) रमाई आवास योजनेंतर्गत प्रति घरकुल अनुदान साधारण क्षेत्र रु १.२० लक्ष व डोंगराळ क्षेत्रासाठी रु १.३० लक्ष निश्चित करण्यात आली आहे.
२) स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सदर योजनेतील लाभार्थ्यांकरीता शौचालय बांधकामाकरीता रु १२,०००/- निधी ची तरतूद आहे.
३) घरकुल सहायता व्यतिरिक्त घरकुल बांधकामा करीता मनरेगा अंतर्गत ९०/९५ दिवसाचे अकुशल मजुरीचे तरतूद आहे.
पात्रता/निकष :-
१) लाभार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द संवर्गातील असावा.
२) लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान १५ वर्षाचे असावे.
३) लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे.
४) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण क्षेत्राकरिता रुपये १.२० लाख रुपये ठरवून देण्यात आलेले आहे.
५) शक्यतो लाभार्थीची स्वतःची कमीत कमी २६९ स्के. फुट जागा असावी अथवा त्याचे स्वतःचे क घर असलेल्या ठिकाणी घर बांधण्यात येईल.
६) सदर योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीस देण्यात येतो, विभक्त कुटुंब असल्यास रेशनकार्ड विचारात घेण्यात येतो.
७) जागा कमी उपलब्ध असेल तर त्या ठिकाणचे सर्व पात्र इच्छुक लाभार्थी मिळून दोन पेक्षा जास्त एकत्रित बांधकाम ग्रुप हाऊसिंग करता येऊ शकते. शासनाच्या इतर गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
९) सामाजिक व आर्थिक व जात सर्वेक्षण २०११ च्या प्रपत्र ड मध्ये असलेले अनुसूचित जाती तथा नवबौध्द घटकातील जे लाभार्थी रमाई आवास योजनेचे ग्रामीण अदययावत निकष पुर्ण करत असतील असे लाभार्थी रमाई आवास घरकुल ग्रामीण या योजनेत लाभार्थी म्हणून पात्र असतील.
लाभार्थी:
उक्त नमुद केल्यानूसार
फायदे:
उक्त नमुद केल्यानूसार
अर्ज कसा करावा
—